Author: Sonali Pawar

  • प्रति पंढरपूर करहरमध्ये वारकऱ्यांच्या मुखी संतांचा गजर

    प्रति पंढरपूर करहरमध्ये वारकऱ्यांच्या मुखी संतांचा गजर

    पाऊली चालती करहर प्रति पंढरीची वाट…. अशी भक्तीची प्रथा करहर नगरीत गेले अनेक वर्ष पासून सुरू आहे.आषाढी एकादशी निमित्त उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या मुखी फक्त विठू माऊली व संतांचा गजर असे दृश्य पाहून ग्रामीण भागातून आलेल्या हरिभक्त पारायण यांना मनशांती मिळाली आहे.
    करहरच्या भूमीत अध्यात्मिक समाधानाने आषाढी एकादशीला संतमात्म्यांनी केलेल्या कार्याचा गौरव वारकऱ्यांच्या मुखातून टाळ मृदंगाच्या नादात गुंतला गेला.
    विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला जावळी तालुक्यातील करहर परिसरातील पालखी सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्यच.आज माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जावळीचे तहसीलदार हनमंतराव कोळेकर,गटविकास अधिकारी मनोज भोसले,मेढा पोलीस अधिकारी पृथ्वीराज ताटे व उद्योजक वसंतराव मानकुंमरे,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ (बाबा)शिंदे,जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे,आमदार शशिकांत शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे,रवि परामणे,अमोल शिंदे यांच्यासह खेड्यापाड्यातून पालखी घेऊन आलेल्या भक्तगणांनी श्री माऊलीचे दर्शन घेऊन सर्वांना सुख- शांती- समृद्धी मिळावी अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.

    काटवली,पानस, दापवडी, विवर,कावडी,बेलोशी,वहागाव,महू-हातगेघर,खर्शी- बारामुरे,दांडेघर,आखाडे, हुमगाव,आंबेघर,सलपाने,रुईघर, कुडाळ,शेते,भालेघर,सोमर्डी,पाचगणी,रांनगेघर, इंदवली,आलेवाडी,भिवडी, सोनगाव,दरे,भिलार,महाबळेश्वर,मेढा,सायगाव,बामणोली अशा अनेक गाव वाड्या वस्तीतील वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
    माता भगिनींसोबत युवा पिढीचे आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढत आहे.खऱ्या अर्थाने करहर नगरी आषाढी एकादशी निमित्त एक दिवसासाठी अध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
    करहर परिसरातील भाविक व वारकरी ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून करहर नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज,संत गाडगे महाराज अशा संत महात्म्यांच्या नावाच्या दिंडी घेऊन प्रति पंढरपूर नगरीत येऊन माऊलीच्या प्रतिभेचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली असते.

    विठ्ठल नामाचा गजर सर्वत्र घुमत असल्याने खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर सजून गेले.वास्तविक पाहता वर्षभर अनेक घडामोडी घडतात? या काळात राजकीय वादन व चिपळ्यांच्या आवाजही वारकऱ्यांच्या आवाजात मिसळून जातो. त्याचेही दर्शन या निमित्त करहर परिसरात दिसून आले आहे.
    प्रति पंढरपूर म्हणजे करहर हे जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र होय.आषाढी एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही.अशा प्रामाणिक व स्वच्छ मनाच्या वारकऱ्यांसाठी करहर या गावात बहिर्जी पांगारे नावाच्या एका विठ्ठल भक्त त्याच्या भक्तीमुळे हे प्रति पंढरपूर उभे राहिलेले आहे.निरंजन नदीच्या डोळ्यात स्नानासाठी गेले असता त्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती सापडली.या मूर्तीची प्रतिष्ठापना करहर गावातील दानशूर व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या एका पिढीने केली.
    आजही या ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी सुमारे दहा हजार भाविक व वारकरी या प्रति पंढरपूर मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.ह.भ.प दत्तात्रय महाराज कळंबे यांनी पन्नास वर्षांपूर्वी आषाढी वारी सुरू करून खऱ्या अर्थाने संघर्षाच्या वादळ वाऱ्यातही आध्यात्मिक ज्योत तेवित ठेवण्याचे अत्यंत अवघड काम सहजरीत्या पार पाडले आहे.बेलोशी येथे दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या समाधीस्थळी याचे पूर्ण नियोजन करण्यात येते.कळंबे महाराजांच्या पादुकांचे काटवलीला प्रस्थान व त्यानंतर या दिंडीला सुरुवात होते.दापवडी येथे पहिले रिंगण व महू येथे गोल रिंगण झाल्यानंतर ह.भ.प अविनाश महाराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दिंडी सोहळा शांततेत संपन्न झाला.यावेळी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच अनेक सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांना मोफत फराळ वाटप केले.

  • उद्घाटना आधीच बालवाडी इमारत खिळखिळी

    उद्घाटना आधीच बालवाडी इमारत खिळखिळी

    काटवली (ता. जावली) येथे उभारण्यात आलेल्या बालवाडी इमारतीचे काम उद्घाटना आधीच खिळखिळे झाले असून भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून ठिकठिकाणी फरशीही खचली आहे. यामुळे या ठेकेदाराच्या कामाबाबतची ठेकेदाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की काटवली ता.जावली येथे दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी इमारतीसाठी शासकीय योजनेतून निधी उपलब्ध झाला होता.या कामाला ज्या मुख्य ठेकेदाराला काम दिले होते. त्या ठेकेदाराने आपल्या दुसऱ्या सब ठेकेदाराकडून हे काम करून घेतले आहे.अद्यापही या इमारतीचे उद्घाटन झाले नसून यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात बालवाडीच्या मुलांना बसवले जात आहे.

    परंतु गेले चार महिन्यापूर्वी या नव्या कोऱ्या अंगणवाडीच्या इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून ठिकठिकाणी फरशी खचून फुटली आहे.त्यामुळे उद्घाटना आधीच गावाची जागा तसेच शासनाचा निधी याचा अपव्य झाल्याचा दिसून येत आहे.
    शिक्षण विभागाने पाहणी करून ही इमारत भेगाळल्याने या ठिकाणी शाळा भरवू नये आशा सूचना केल्या आहेत.
    त्यामुळे इमारत असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.संबंधित ठेकेदार व अधिकारी पाहणी करून गेले परंतु कसलीही कार्यवाही त्यांनी केली नाही. त्यामुळे अंगणवाडी मुलांचा प्रश्न गंभीर झाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून या इमारत दुरुस्तीचे काम त्या ठेकेदाराने सुधारितपने व तातडीने करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

    चौकट:

    या इमारतीचे अद्यापही लोकार्पण केलेले नाही त्या आधीच या इमारतीचा बोऱ्या वाजल्याने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेने शाळेच्या मुलांचे मात्र नुकसान होणार आहे. तसेच अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

    कोट:

    ठेकेदाराला काळ्या यादीत टाका…

    संबंधित शाळेच्या ठेकेदाराने स्वतः काम करण्याऐवजी दुसऱ्याला काम दिले. त्याने ते काम रात्रीच्या वेळी कशाही पद्धतीने उरकले आहे. त्यामुळे बांधकामांचे नियम त्यांनी अक्षरशः धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. हे काम त्यांनी तातडीने करून द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

  • 3 जुलैला कुडाळ येथे नोंदणी कॅम्पचे आयोजन: सौरभ (बाबा)शिंदे

    3 जुलैला कुडाळ येथे नोंदणी कॅम्पचे आयोजन: सौरभ (बाबा)शिंदे

    प्रतिनिधी:विक्रम खटावकर
    राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला लागणारे उत्पन्न व डोमासिलचे दाखले तालुक्यातील महिलांना संबंधित मंडल कार्यालयात कॅम्प लावून तात्काळ द्यावेत अशी मागणी आज जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ (बाबा) शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार श्री हणमंत कोळेकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.तसेच राज्य शासनाच्या महत्वकांशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत चर्चा होऊन महसूल विभागामार्फत दिले जाणारे उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी महिलांना खूप अडीअडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सौरभ (बाबा) शिंदे यांनी प्रशासनाच्या नजरेस आणून दिले आहे.

    त्याचप्रमाणे विविध डोंगरी भागातून सर्वच महिलांना तालुक्याच्या ठिकाणी येणे अडचणीचे ठरणार आहे.तसेच उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी महिलांची आर्थिक फसवणूकही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा सर्व बाबींचा विचार करून तहसील कार्यालय जावली व मंडल कार्यालय कुडाळ यांच्या वतीने 3 जुलै रोजी सकाळी १० ते 5 या वेळेत स्वामी मंगल कार्यालय कुडाळ येथे महिलांना दाखल्या संदर्भात लागणारी सर्व प्रशासकिय कागदपत्रे दिले जाणार आहेत.तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ (बाबा)शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
    तहसीलदार हनमंत कोळेकर यांना निवेदन देताना प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सौरभ (बाबा)शिंदे,आंनदराव मोहिते पाटील-संचालक प्रतापगड सहकारी साखर कारखाना,अमोल शिंदे-संचालक कुडाळ सेवा सोसायटी,भगवान राक्षे व इतर सहकारी उपस्थीत होते.तसेच या नोंदणी कॅम्पला सौरभ (बाबा) युवा मंच यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

  • शिक्षण हाच करिअरचा भक्कम पाया :किरण बगाडे

    शिक्षण हाच करिअरचा भक्कम पाया :किरण बगाडे

    सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांनी स्वतच्या अंगावर दगड शेण्या झेलून महिला वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले.चूल आणि मूल यात अडकून न राहता मुलगी शिकली तरच ती घर घडवू शकते. महिला शिक्षणामुळे महिला राष्ट्रपती,मंत्री खासदार,आमदार,या अनेक उच्च पदावर कार्यरत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेन तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे.शिक्षणामुळे आपल्याला हक्क आणि अधिकार प्राप्त होतात त्यामुळे शिकल पाहिजे.स्वतः मला परिस्तिथी मुळे शिकता आले नाही त्यामुळे त्याचीच उणीव मनात धरून तळागाळातील,सर्वसामान्य कुटुंबातील,वंचित घटकामधील मुलांना परिस्तिथी मुळे शिकता येत नाही.भटके विमुक्त जाती मधील मुलांना शिक्षणाची आवड आणि गोडी निर्माण व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे जिल्हा सचिव आयु.किरण बगाडे यांनी सामजिक बांधिलकी जोपासत आपण ही समाज्याचे काहीतरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून किरण बगाडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलावडे शाळेतील मुलांना मोफत वह्या वाटप पेन वाटप तसेच अंगणवाडी मधील मुलांना सकस खारीक वाटप करण्यात आले.

    यावेळी मुख्याध्यापक दळवी मॅडम,पालकर मॅडम,अंगणवाडी सेविका अश्विनी शिंदे तसेच अजित शिंदे अनिल शिंदे, सनी बगाडे, महिला ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.त्याच बरोबर सलग पाचव्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित जिल्हा किरण बगाडे सामाजिक बांधिलकी जपत यांनी परिषद प्राथमिक शाळा बेलावडे, जि.प.प्राथमिक शाळा आखाडे, जि.प.प्राथमिक शाळा सनपाने, जि.प.रासाई नगर,आखाडे फाटा, या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच करंदी तर्फे कुडाळ, म्हसवे मधील आंबेडकर नगर मधील सर्व मुलांना मोफत वह्या आणि पेन वाटप करण्यात आले.

  • मला पाडण्यासाठी पंतप्रधानांना यावे लागले:आ.शशिकांत शिंदे

    मला पाडण्यासाठी पंतप्रधानांना यावे लागले:आ.शशिकांत शिंदे

    माझा पराभव तांत्रिक झाला आहे.माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातारा जिल्हयात यावे लागले त्यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री,अनेक मंत्री,जिल्ह्यातील त्यांच्या विचाराचे आमदार,खासदार यांना अनेक सभा घ्याव्या लागल्या.मात्र जनतेने हि निवडणूक हातात घेतल्याने व पहिल्या फळीचे नेते आपल्या बरोबर नसले तरी ५ लाख ३६ हजार मताधिक्य देण्याचा प्रयत्न झाला हे थोडके नाही.विजय आपलाच होता.पण जिल्ह्यात शशिकांत शिंदेचे महत्व वाढेल म्हणून काहींनी भितीपोटी सहकार्य केले नाही.त्यामुळेच समोर विजय असताना पराभवाला सामोरे जावे लागले.अपयशाने खचून जाणारा मी नाही.शशिकांत शिंदे काय आहे हे आता जिल्हयातील नेत्यांना दाखवून देणार आहे.पक्ष संघटना व खा.शरद पवार साहेबांचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुचित करून निवडणूकीत मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आ.शशिकांत शिंदे यांनी आभार मानले.
    केडंबे ता.जावली येथील सभामंडपाचे लोकार्पन सोहळ्या प्रसंगी आ.शशिकांतजी शिंदे बोलत होते.आ.शिंदे पुढे बोलताना म्हणाले,या सरकारकडे जनतेच्या विकासाचा निर्णय नाही.जातीय वाद,बेकारी,बेरोजगारी वाढविण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले.ओरीसा,आंध्र प्रदेश,दिल्ली,मध्य प्रदेश या ठिकाणी भाजपला सहकार्य झाले नसते तर त्याचे सरकार आले नसते.दुसऱ्यांच्या कुबडया घेवून स्थापनं झालेले सरकार जास्त दिवस चालणार नाही.मी पराभवाला घाबरत नाही.विजयी झालो असतो तर खासदार काय असतो हे राज्याला दाखवून दिले असते.
    येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत सत्ता महाविकास आघाडीचीच येणार असून जावलीचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास आ.शिंदे यांनी व्यक्त केला.या प्रसंगी आदिनाथ ओंबळे यांनी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याबरोबरच प्रलंबीत असणारे बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केली. तर बाळासाहेब ओंबळे व महादेव ओंबळे यांनी सभामंडपाचे उर्वरित कामाबरोबरच इतर कामांना निधी उपलब्ध करण्याबाबत विनंती केली.

    प्रारंभी आ.शशिकांतजी शिंदे यांचे शुभहस्ते फित कापून सभामंडपाचे उद्धाटन करण्यात आले.या प्रसंगी प्रतापगड चे संचालक आनंदराव जुनघरे, श्रमिकचे संस्थापक आदिनाथ ओंबळे,राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे,महिला अध्यक्षा सौ.रूपाली भिसे,सुनिल फरांदे,संतोष बैलकर,मोहन देशमुख,कोंडीबा ओंबळे,चंद्रकांत ओंबळे,राजाराम ओंबळे,यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
    उपस्थीताचे स्वागत बाळासाहेब ओंबळे यांनी केले तर आभार बळवंत पाडळे यांनी मानले.

  • मैत्री ग्रुपच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

    मैत्री ग्रुपच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

    मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने जावली तालुक्यातील डोंगर माथ्यावरील शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
    यामध्ये रेनकोट, दफ्तर, पट्टी ,पेन्सिल, वह्या याचा समावेश होता. शाळेचा पहिला दिवस होता आणि मुलांना अनपेक्षित पणे या गोष्टी मिळाल्या हे सर्व पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांनी मैत्री ग्रुप जावलीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.तसेच मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी या विभागातून फिरताना लोकांना काय समस्या आहेत ते जाणून घेतल्या आणि कसलीही मदत लागली तर मैत्री ग्रुप नेहमी तुम्हाला सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
    त्याच प्रमाणे पिंपळबन बामणोली येथे मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने २०० विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.या प्रसंगी बामणोली ग्रामस्थ उपस्थित होते.मैत्री ग्रुपचे उपाध्यक्ष तसेच मैत्री ग्रुपचे ग्रामीण प्रमुख वैभव पवार व सदस्य बहुसंखेने उपस्थित होते.

  • मैत्री ग्रुपच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

    मैत्री ग्रुपच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

    मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने जावली तालुक्यातील डोंगर माथ्यावरील शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
    यामध्ये रेनकोट, दफ्तर, पट्टी ,पेन्सिल, वह्या याचा समावेश होता. शाळेचा पहिला दिवस होता आणि मुलांना अनपेक्षित पणे या गोष्टी मिळाल्या हे सर्व पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांनी मैत्री ग्रुप जावलीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.तसेच मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी या विभागातून फिरताना लोकांना काय समस्या आहेत ते जाणून घेतल्या आणि कसलीही मदत लागली तर मैत्री ग्रुप नेहमी तुम्हाला सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
    त्याच प्रमाणे पिंपळबन बामणोली येथे मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने २०० विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.या प्रसंगी बामणोली ग्रामस्थ उपस्थित होते.मैत्री ग्रुपचे उपाध्यक्ष तसेच मैत्री ग्रुपचे ग्रामीण प्रमुख वैभव पवार व सदस्य बहुसंखेने उपस्थित होते.

  • वाई-उडतरे-अक्कलकोट बस सेवा सुरू

    वाई-उडतरे-अक्कलकोट बस सेवा सुरू

    खंडाळा-वाई- अक्कलकोट अश्या मार्गाने सुरू झालेल्या बसचे आज मान्यवरांच्या शुभ हस्ते उडतरे ता.वाई येथे चालक व वाहक यांचा सत्कार करून मोठ्या उत्साहात स्वागत कारण्यात आले.
    उडतरे गावचे सामाजिक कार्यकर्ते सूरज सुतार आणि खंडाळा डेपोच्या डेपो मॅनेजर व याच गावच्या ग्रामस्थ सौ.नीता जगताप यांच्या प्रयत्नाने गाडीला उडतारे हा थांबा देण्यात आला आहे.तर पुढे आनेवाडी थांबा देखील असणार आहे.आज उडतारे ग्रामस्थांच्या वतीने ह्या गाडीचे पूजन व स्वागत करण्यात आले.पाचवड-आनेवाडी-कुडाळ विभागातील अनेक ग्रामस्थ नेहमी श्री स्वामी समर्थदर्शनासाठी अक्कलकोट येथे जात असतात.मात्र या मार्गातून थेट जाणारी कोणतीही बस आजपर्यत उपलब्ध नव्हती.भक्तांची गरज ओळखून खंडाळा येथून सकाळी 7.30 वाजता सुटणाऱ्या बसचा मार्ग वाई-पाचवड- उडतारे-सातारा-कोरेगाव-पुसेगाव-गोंदवले-म्हसवड-पंढरपूर-मोहोळ-सोलापूर व अक्कलकोट असा आहे.त्यामुळे ह्यापैकी कोणत्याही देवस्थानला जाण्याऱ्या भाविकांना उत्तम सोय झाली आहे.ह्या गाडीला सर्व सवलती असून ज्येष्ठ नागरिक, महिलांना अर्धे तिकीट,अपंगांना विशेष सूट इत्यादी सुविधा आहेत.गाडी उडतारे येथे सकाळी ठीक १०.३० वाजता येणार आणि अक्कलकोट वरून सकाळी ठीक ७.०० वाजता निघणार आहे.
    या बसला उडतारे ते अक्कलकोट फुल्ल तिकीट ४३५ रुपये आहे आणि महिलांसाठी अर्धे तिकीट २२५ रुपये आहे.
    यावेळी खंडाळा आगाराच्या प्रमुख सौ.नीता जगताप यांनी या परिसरातील भाविकांनी या बसच्या माध्यमातून अक्कलकोट दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
    यावेळी विनोद जगताप,शिवाजी मोहिते,सुरज सुतार,संतोष जगताप, संदिप चव्हान,विकास चव्हाण,संपत पवार,योगेश बाबर,प्रदिप बाबर, निळकंठ शेंडगे यांच्यासह दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र उडतारे, येथील स्वामी समर्थ महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते.याप्रसंगी अन्वित मोहिते या बालकाकडून गाडीसाठी नामफलक देण्यात आला.

  • श्री क्षेत्र मामुर्डी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न

    श्री क्षेत्र मामुर्डी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न

    श्री क्षेत्र मामुर्डी येथे २ मे ते ९ मे रोजी अखंड हरीनाम सप्ताह सुरू होता हभप अतुल महाराज यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली सकाळी काकड आरती,ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन,प्रवचन, किर्तन,भजन जागर असे कार्यक्रम सुरळीत पार पडले. सदर सप्ताहमध्ये सर्व हभप संतोष महाराज दळवटे,संतोष महाराज महामुलकर,विठ्ठल महाराज सकुंडे, हणमंत महाराज पार्ट,बापू महाराज महांगरे,सुभाष महाराज मिस्त्री गोगवे,इथापे महाराज यांची प्रवचने झाली.
    अखंड हरीनाम सप्ताह मध्ये सर्व हभप यशवंत महाराज वाटेगावकर,शिवाजी महाराज आग्रे,रोहीत महाराज शिंदे-सरकार,अविनाश महाराज महाडिक जावळीकर,विशाल महाराज थोपटे पिंपरे खुर्द पुरंदर, प्रविण महाराज शेलार (श्री विठ्ठलधाम आंबेघर),संगित विशारद सुप्रीयाताई खडांगळे,आणि काल्याचे किर्तन हभप अतुल महाराज देशमुख गांजे यांनी हरी किर्तन सेवा केली सदर सप्ताहमधे भजन मंडळ गवडी,वागदरे,गोंदेमाळ , तांबी तर्फे मेढा,अचानक भजन मंडळ मेढा यांचा सुस्वर भजनाचा जागराचा कार्यक्रम झाला
    सदर कायक्रमात लकी ड्रॉ मधील विजेते महिलांना पैठणी साडी व पुरुषांना उपरणे टोपी देणेत आली विजेते सिताबाई नारायण सुळ,आनंदशेठ बापु धनावडे,वैशाली सुभाष धनावडे,कु.अनिकेत धोंडीबा मोरे,कु.अक्षता नामदेव धनावडे ,सोपान आनंदा धनावडे,हिराबाई किसन धनावडे ,नामदेव रावजी धनावडे,आरती सचिन बिरामणे ,बाजीराव नवलु पार्टे गोंदेमाळ,विमल किसन धनावडे,किसन जुनघरे चोपदार,कामिनी विठ्ठल जुनघरे दिवदेववाडी
    रमेश नाना म्हस्कर सावली,कमल जुनघरे सावली,हभप कल्याण महाराज इथापे विजेते आहेत
    दि ९ मे रोजी काला किर्तना नंतर श्री विठ्ठल मंदिर ते श्री केदारेश्वर मंदिर मोठ्या उत्साहात दिंडी काढणेत आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे प्रांगणात सर्व भाविकांना महाप्रसाद देवून सोहळा संपन्न झाला.

    शिवजन्मोत्सव निमित्त मेढा पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील मॅडम यांचे हस्ते ध्वजपुजन करणेत आले शिवभक्तांचे उपस्थितीत मामुर्डी गावचे प्रथम नागरीक जगन्नाथ राऊ धनावडे यांचे हस्ते स्मारकाचे पुजन करून अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालणेत आला परिसरातील सर्व शिवज्योत पथकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास भेटी दिल्या सदर पारायण सप्ताह यशस्वी करणेसाठी श्री केदारेश्वर भजन मंडळ , श्री केदारेश्वर विकास मंडळ , छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब , महिला मंडळ , सर्व ग्रामस्थ तसेच पारायण मंडळाचे सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली

    टिप:- अखंड हरीनाम सप्ताह मध्ये काल्याचे किर्तन संपत असताना एक ग्रहस्थ माऊलीच्या मंडपात आला त्याचे अंगावर पूर्ण मळलेली वस्त्रे होती अंगावरील वस्त्रावरून तो भिकारी वाटत होता त्यावेळी ज्ञानदेव भाऊ माईक वरून देणगी पुकारत असताना सदर व्यक्तीने आपल्या मळलेल्या झोळीतून २१/- एकवीस रुपये काढून माऊलीच्या महाप्रसादासाठी देणगी दिली त्यावेळी कळत नकळत सर्वांनी त्याला हात जोडले कारण देव कोणत्या रूपात प्रकट होईल काही सांगता येत नाही काही क्षणभर मंडपात शांतता पसरली नंतर पारायण मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांचे वतीने त्याचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे पंगतीमध्ये बसुन त्याने प्रसाद सेवन केला आणि तो ग्रहस्थ मार्गस्थ झाला सदर व्यक्तीची सर्व भाविक भक्त दिवसभर चर्चा करीत होते

    फोटो :- माऊलीच्या मंडपात आलेल्या अनोळखी भाविकाचा सन्मान करताना राजेंद्र धनावडे विलास धनावडे ज्ञानदेव धनावडे बाजीराव धनावडे नामदेव धनावडे बजरंग चौधरी आनंदराव धनावडे वसंतराव धनावडे सुनिल आण्णा धनावडे व इतर मान्यवर

  • श्री क्षेत्र मामुर्डी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न पारंपारिक शिवजन्मोत्सव साजरा

    श्री क्षेत्र मामुर्डी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न पारंपारिक शिवजन्मोत्सव साजरा

    श्री क्षेत्र मामुर्डी येथे २ मे ते ९ मे रोजी अखंड हरीनाम सप्ताह सुरू होता हभप अतुल महाराज यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली सकाळी काकड आरती,ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन,प्रवचन, किर्तन,भजन जागर असे कार्यक्रम सुरळीत पार पडले. सदर सप्ताहमध्ये सर्व हभप संतोष महाराज दळवटे,संतोष महाराज महामुलकर,विठ्ठल महाराज सकुंडे, हणमंत महाराज पार्ट,बापू महाराज महांगरे,सुभाष महाराज मिस्त्री गोगवे,इथापे महाराज यांची प्रवचने झाली.
    अखंड हरीनाम सप्ताह मध्ये सर्व हभप यशवंत महाराज वाटेगावकर,शिवाजी महाराज आग्रे,रोहीत महाराज शिंदे-सरकार,अविनाश महाराज महाडिक जावळीकर,विशाल महाराज थोपटे पिंपरे खुर्द पुरंदर, प्रविण महाराज शेलार (श्री विठ्ठलधाम आंबेघर),संगित विशारद सुप्रीयाताई खडांगळे,आणि काल्याचे किर्तन हभप अतुल महाराज देशमुख गांजे यांनी हरी किर्तन सेवा केली सदर सप्ताहमधे भजन मंडळ गवडी,वागदरे,गोंदेमाळ , तांबी तर्फे मेढा,अचानक भजन मंडळ मेढा यांचा सुस्वर भजनाचा जागराचा कार्यक्रम झाला
    सदर कायक्रमात लकी ड्रॉ मधील विजेते महिलांना पैठणी साडी व पुरुषांना उपरणे टोपी देणेत आली विजेते सिताबाई नारायण सुळ,आनंदशेठ बापु धनावडे,वैशाली सुभाष धनावडे,कु.अनिकेत धोंडीबा मोरे,कु.अक्षता नामदेव धनावडे ,सोपान आनंदा धनावडे,हिराबाई किसन धनावडे ,नामदेव रावजी धनावडे,आरती सचिन बिरामणे ,बाजीराव नवलु पार्टे गोंदेमाळ,विमल किसन धनावडे,किसन जुनघरे चोपदार,कामिनी विठ्ठल जुनघरे दिवदेववाडी
    रमेश नाना म्हस्कर सावली,कमल जुनघरे सावली,हभप कल्याण महाराज इथापे विजेते आहेत
    दि ९ मे रोजी काला किर्तना नंतर श्री विठ्ठल मंदिर ते श्री केदारेश्वर मंदिर मोठ्या उत्साहात दिंडी काढणेत आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे प्रांगणात सर्व भाविकांना महाप्रसाद देवून सोहळा संपन्न झाला.

    शिवजन्मोत्सव निमित्त मेढा पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील मॅडम यांचे हस्ते ध्वजपुजन करणेत आले शिवभक्तांचे उपस्थितीत मामुर्डी गावचे प्रथम नागरीक जगन्नाथ राऊ धनावडे यांचे हस्ते स्मारकाचे पुजन करून अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालणेत आला परिसरातील सर्व शिवज्योत पथकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास भेटी दिल्या सदर पारायण सप्ताह यशस्वी करणेसाठी श्री केदारेश्वर भजन मंडळ , श्री केदारेश्वर विकास मंडळ , छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब , महिला मंडळ , सर्व ग्रामस्थ तसेच पारायण मंडळाचे सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली

    टिप:- अखंड हरीनाम सप्ताह मध्ये काल्याचे किर्तन संपत असताना एक ग्रहस्थ माऊलीच्या मंडपात आला त्याचे अंगावर पूर्ण मळलेली वस्त्रे होती अंगावरील वस्त्रावरून तो भिकारी वाटत होता त्यावेळी ज्ञानदेव भाऊ माईक वरून देणगी पुकारत असताना सदर व्यक्तीने आपल्या मळलेल्या झोळीतून २१/- एकवीस रुपये काढून माऊलीच्या महाप्रसादासाठी देणगी दिली त्यावेळी कळत नकळत सर्वांनी त्याला हात जोडले कारण देव कोणत्या रूपात प्रकट होईल काही सांगता येत नाही काही क्षणभर मंडपात शांतता पसरली नंतर पारायण मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांचे वतीने त्याचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे पंगतीमध्ये बसुन त्याने प्रसाद सेवन केला आणि तो ग्रहस्थ मार्गस्थ झाला सदर व्यक्तीची सर्व भाविक भक्त दिवसभर चर्चा करीत होते

    फोटो :- माऊलीच्या मंडपात आलेल्या अनोळखी भाविकाचा सन्मान करताना राजेंद्र धनावडे विलास धनावडे ज्ञानदेव धनावडे बाजीराव धनावडे नामदेव धनावडे बजरंग चौधरी आनंदराव धनावडे वसंतराव धनावडे सुनिल आण्णा धनावडे व इतर मान्यवर